संजय लिला भन्साळी रागात अभिनेत्यावर फोन फेकतात? सोनाक्षीने केला खुलासा, म्हणाली 'मी एकच सीन 16 वेळा केल्यानंतर...'

Sonakshi Sinha on Sanjay Leela Bhansali: हिरामंडी (Heeramandi) वेब सीरिजच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) पहिल्यांदाच दिग्दर्शक संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासह काम केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 9, 2024, 04:20 PM IST
संजय लिला भन्साळी रागात अभिनेत्यावर फोन फेकतात? सोनाक्षीने केला खुलासा, म्हणाली 'मी एकच सीन 16 वेळा केल्यानंतर...' title=

Sonakshi Sinha on Sanjay Leela Bhansali: हिरामंडी (Heeramandi) वेब सीरिजच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) पहिल्यांदाच दिग्दर्शक संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासह काम केलं आहे. वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. दरम्यान तिने नुकतंच संजय लिला भन्साळी यांच्यासह काम कऱण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलं. संजय लिला भन्साळी जगातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक असल्याचं सोनाक्षीने म्हटलं आहे. 

संजय लिला भन्साळी आपल्या तापट स्वभावासाठीही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. ते संतापात मोबाईल अभिनेत्यावर फेकून देतात किंवा व्यक्त होतात असं सांगितलं जातं. पण सोनाक्षी सिन्हाने हा दावा फेटाला आहे. आपण सुरुवातीला थोडेसे घाबरलेलो होतो अशी कबुली देताना सोनाक्षीने त्यांनी आपल्या कामाचं कौतुक केल्याचं म्हटलं आहे. एका सीनसाठी 16 टेक घेण्यात आल्याचंही तिने सांगितलं. 

झूमला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने संजय लिला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगत म्हटलं की, "मी खोटं बोलणार नाही, पण मी थोडी घाबरले होते. पण जेव्हा मी त्यांच्यासह काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनाही जे मी करत होते, त्यांच्या व्हिजननुसार जे फुलवत होते ते आवडत होतं. त्यांनाही माझ्यासह काम करणं आवडू लागलं आणि नंतर गोष्टी सहज होत गेल्या".

"जगात सध्या कोणीही नाही जो त्यांच्यासारखा चित्रपट तयार करतो. देशात तर नक्कीच कोणी नाही. त्यामुळे जर कोणी त्यांच्या व्हिजनला जोड देत असेल तर तो एकाप्रकारे सारखाच विचार करत आहे. ते फार आनंदी असतात. पण जर कोणी त्याच्याशी छेडछाड केली तर मात्र ते संतापतात," असं सोनाक्षीने सांगितलं. 

सोनाक्षीने यावेळी मनिषा कोईरालासह एका सीनसाठा 16 टेक दिल्याची आठवण सांगितलं. जेव्हा त्यांनी संजय लिला भन्साळींना आता हवा असलेला शॉट मिळाला असावा असं सांगितलं तेव्हा त्यांनी भन्नाट उत्तर दिलं. 

“एक सीन असा होता ज्यामध्ये मल्लिकाजान माझ्या नथुत्रयीला बिघडवते. ती पैसे टाकते आणि निघून जाते. मला खरोखर अपमानित, रागावलेले दिसावं लागणार होतं. त्या वेदना मला दाखवाव्या लागणार होत्या. त्यामुळे आम्ही सुमारे 15-16 टेक केले. मला माहिती होतं की तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या टेकमध्येच त्यांना मिळाला होता. ते सतत तडजोड कत होत. मी अशा प्रकारची अभिनेत्री आहे जिला सारखे रिटेक दिल्याने फार नीरस वाटतं आणि सारखी पुनरावृत्ती होतं आहे असं वाटतं. 16 व्या टेकला मला तसं वाटू लागलं होतं. त्यांनी मला विचारलं की,  'तुला वाटतंय का आपल्याला हवं ते मिळालं? तुम्हाला अजून एक करायचा आहे असं वाटतं का?’ मी त्यावर नाही म्हटलं. मला वाटतं तुम्हाला हवा असलेला सीन मिळाला आहे असं उत्तर मी दिलं. त्यावर त्यांनी 'तू फार आळशी झाली आहेस' असं उत्तर दिलं".

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाला संजय लिला भन्साळी रागात अभिनेत्यांवर फोन फेकतात का? अशी विचारणा केली. त्यावर सोनाक्षीने सर्व अफवा असल्याचं सांगत फेटाळलं. "या पूर्णपणे अफवा आहेत. पण हो टास्क मास्टर आहेत. मी ते नाकारणार नाही. पण तो त्यांचा हक्क आहे, कारण ते जे काही काम करतात त्यात ती जादू दिसते," असं सोनाक्षीने म्हटलं.